Subhash choure
……………………
भाग ७ वा
………………….
बीड ;उद्या १७ सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मराठवाडा स्वतंत्र झाला आणि कोणत्याही अटीशर्थी विना महाराष्ट्रात सामील झाला आणि स्वतंत्र महाराष्ट्र झाला देव बाप्पा आम्ही मराठवाड्यातील जनता महाराष्ट्रात आहोत पण इतर विभागाच्या तुलनेत आमचा फारसा विकास झाला नाही दे तुम्ही पहाताच आहेत विकासात नेहमीच पश्चिम महाराष्ट्राचा वरचष्मा राहिला आहे आम्हाला आमच्या हक्काच्या पाण्यासाठी आणखी भांडावे लागते अत्यंत दुष्काळी भाग आजही विकसनशील राज्यात दुर्लक्षितच आहे कधी अवकाळी कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ याच्याशी नेहमीच संघर्ष सुरु आहे त्यावेळीहैदराबाद विभागातून मराठवाड्यात आलेल्या मराठा समाजास कुणबी संबोधले जात होते असे काही अभ्यासक म्हणतात पण मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षणाचं लाभ मिळत नाही हे दुःख बाप्पा कोणाकडे मांडावे यासाठी न्यायिक व्यवस्था आहेपण न्याय कधी मिळणार यासह अनेक विषय मराठवाड्यातचे प्रलंबित आहेत पण मराठवाडा स्वतंत्र करण्यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली देव बाप्पा याचा इतिहास असा आहे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला,पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता.त्यावेळच्या ५६५ पैकी ५६२ संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शविली आणि तशी कार्यवाही केली. मात्र हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहादूर नियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते.त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता. हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या 1 कोटी 60 लाख होती. (आज फार काही वाढली आहे देवबाप्पा) यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु केले. दुसज्या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. यांच नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, शंकरसिंग नाईक, विजयेंद्ग काबरा, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते. मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिद्ध झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटश्र्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्हयातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार,विनायकराव चारठाणकर,विश्र्वनाथराव कातनेश्र्वरकर,नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपज्यात स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला. या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, जानकीलालजी राठी, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, किशनसिंग राजपूत,गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड,विश्र्वनाथ भिसे,जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल काढणं शक्य नाही. यासीन जूबेर हैद्राबादी मंञी याने मुक्तीसेनेने ताब्यात घेतलेली परत घेण्याची प्रतिज्ञा केली त्यमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापुर तालूक्यातील जातेगाव माळावर निजामाच्या सैन्याला पुढे सरकु दिले नाहीत यामध्ये मानसिंग राजपुत, लक्ष्मण आवचार, रामलाल राजपूत, व रामचंद्र धंदेवार हे आघाडीवर होते यामध्ये रामचंद्र धंदेवार याना बाळगिर मठ सरला येथे बंदुकीच्या गोळीने वेध घेतल्याने शहीद झाले 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाले.मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या.पहाटे 4 वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर 2 तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, विजयवाड्याकडील बोनाकल ताब्यात घेतले. चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद तर बुलढाण्याकडेच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले. दुसरीकडे वरंगल, बीदर विमानतळावर भारतीय फौजांनी हल्ले केले. 15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेंव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते. हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणांगती स्वीकारली आणि खुद्द निजाम शरण आला. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला. आणि हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला.देव बाप्पा याचा आनंद आम्ही साजरा करतो स्व गोपीनाथराव मुंडे राज्याच्या उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात मराठवाडा मुक्तिसंग्राम या १७ सप्टेंबर पासून ध्वजारोहण सुरु झाले आज देखील याच दिवशी जेष्ठ स्वतंत्र सैनिकाचा प्रशासनाच्या वतीने गौरव करण्यात येतो देव बाप्पा या पेक्षा मराठवाड्यात या दिवशी काहीच होत नाही राजकीय नेत्याची या भागाकडे उदासीनता असल्याने मराठवाडा विकासापासून दूर आहे देव बाप्पा आपण जरा मराठवाड्यातील सर्वच नेत्याची कान टोचावेत हि विनंती
Recent Comments